logo_banner
Breaking
  • ⁕ कर्जदार किसान की 'किडनी बिक्री' मामले में नया मोड़! फरार चल रहे डॉ. रवींद्र पाल सिंह ने कोर्ट में किया सरेंडर, दूसरा मुख्य आरोपी अब भी फरार ⁕
  • ⁕ लाडली बहन योजना में बड़ा खेल! 12 हजार सरकारी कर्मचारियों ने बटोरे पैसे; विधानसभा में सरकार ने कबूली चौंकाने वाली बात ⁕
  • ⁕ Nagpur: बजाजनगर के अवैध रेस्टोरेंट्स पर चलेगा बुलडोजर! हाईकोर्ट की फटकार के बाद फडणवीस सरकार ने खारिज की अपील ⁕
  • ⁕ महाराष्ट्र विधानसभा: मानसून सत्र के तीसरे दिन किसानों के लिए बड़ा ऐलान, 30 जून तक 56 लाख किसानों की कर्जमाफी ⁕
  • ⁕ NEET सेंटर विवाद में बड़ा ट्विस्ट! NTA बोली- अभ्यर्थी ने खुद चुना था एग्जाम सिटी"; पिता तालिब ने दावे को किया ख़ारिज ⁕
  • ⁕ अमरावती में भारी हंगामा: किरीट सोमैया की गाड़ी के आगे लेटे MIM कार्यकर्ता, पुलिस ने बल प्रयोग कर हटाया ⁕
  • ⁕ खड़ी निजी बस में लगी आग, टेकड़ी रोड के एमपी बस स्टैंड की घटना; परिसर में मचा हड़कंप ⁕
  • ⁕ विदर्भ सहित राज्य के 247 नगर परिषदों और 147 नगर पंचायतों में अध्यक्ष पद का आरक्षण घोषित, देखें किस सीट पर किस वर्ग का होगा अध्यक्ष ⁕
  • ⁕ अमरावती में युवा कांग्रेस का ‘आई लव आंबेडकर’ अभियान, भूषण गवई पर हमले के खिलाफ विरोध प्रदर्शन ⁕
  • ⁕ Gondia: कुंभारटोली निवासियों ने विभिन्न मुद्दों को लेकर नगर परिषद पर बोला हमला, ‘एक नारी सबसे भारी’ के नारों से गूंज उठा आमगांव शहर ⁕
Nagpur

रात्री झाडीपट्टीचं नाटक पाहिलं अन् पहाटे स्वत: सरण रचून आयुष्य संपवलं!


नागपूर जिल्ह्यातून  एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका वृद्धाने स्वतः सरण रचून पेटवून घेत आत्महत्या केली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही गावात आत्माराम मोतीराम ठवकर (80 वर्ष) या वृद्धाने त्यांच्या मुलाचा गॅस गोडाऊन असलेल्या शेतात एका बाजूला स्वतःच सरण रचून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  

महाशिवरात्रीच्या दिवशी (1 मार्चला) किन्ही गावाबाहेर असलेल्या मुलाच्या शेतात आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केल्याचे काल उघडकीस आले.  मृतक आत्माराम हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी असायचे.

काल रात्री त्यांनी गावात मंडई निमित्त सुरू असलेले झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद घेतला होता. पहाटे पाच वाजता शेताकडे गेले आणि शेतात असलेले लाकडं एकत्र करून सरण रचले, त्यावर तनस (गवत) टाकलं आणि त्यावर बसून सरण पेटवून घेत आत्महत्या केली. सकाळी त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळाले.

वेलतुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. दरम्यान आत्माराम ठवकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी पानाचा एक विडा आणि दिवा आढळून आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. ही घटना खरंच आत्महत्या आहे की घातपात आहे,  याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.